Source :- ZEE NEWS
No water at Pakistan International Airport : पाकिस्ताननं 28 मे रोजी ‘यौम-ए-तकबीर’ म्हणजेच त्यांच्या अणुशक्ती मिळवल्याचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. 1998 मध्ये याच दिवशी पाकिस्तान अणूबॉम्ब बनवणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला होता. या दिवशी देशभरात मोठमोठे कार्यक्रम होतात. पण याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री हिना ख्वाजा बयात यांनी देशातील पब्लिक आणि प्रायव्हेट सर्व्हिसेसची दयनीय अवस्था जगासमोर उघड केली आहे.
हिना यांनी सोशल मीडियाव एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, देशातील सर्वात गजबजलेलं जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट (कराची) इथे असलेल्या टॉयलेटमध्ये पाणीही नाही. त्या म्हणाल्या, ‘आज यौम-ए-तकबीर आहे आणि मी कराची विमानतळावर उभी आहे. ज्या दिवशी देशाच्या प्रगतीचा अभिमान बाळगायला हवा, त्या दिवशी इथे टॉयलेटमध्ये पाणीसुद्धा नाही. लोक नमाजसाठी तयारी करतायत, पालक त्यांच्या मुलांना टॉयलेटला नेतायत, पण तिथं पाणी नाही.’
No water in washrooms of Int’l Airport in #Karachi!
A Pakistani Women exposing the failures of system in Pakistan, Pak making big statements of major project development, but even basic amenities are missing in its Airports…its a big shame!#FailedStatePakistan @amritabhinder pic.twitter.com/5yjnVZFthM
— ManhasAnupama (@manhas_anupama) May 29, 2025
पाकिस्ताननं 28 आणि 30 मे 1998 रोजी अणुचाचण्या केल्या होत्या. त्याला आठवणीत ठेवण्यासाठी हा दिवस ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून साजरा केला जातो. हिना यांनी म्हटलं की देशानं जरी अणुशक्ती मिळवली असली, तरी एअरपोर्टवर देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये अजूनही खूप कमतरता आहे. याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
पाकिस्तानच्या यंत्रणा एवढ्या वाईट झाल्या का?
हिना पुढे म्हणाल्या, ‘आपले एअरपोर्ट्स, संस्था, सिस्टिम्स यांची एवढी बिकट परिस्थिती झाली का? महत्त्वाचं म्हणजे कोणालाच हे मान्य करायचं नाही की या चुका आहेत, ज्या सुधारायला हव्यात. नवनवीन प्रोजेक्ट्स सुरू होत आहेत. नव्या ट्रेनसंबंधी चर्चा चालू आहेत, पण मूलभूत गोष्टी, जसं की टॉयलेटमध्ये पाणी नाही, याकडे कुणी का लक्ष देत नाही.’
भारतातील कृतीमुळे पाकिस्तानची पाण्याची तुटवडा उघड?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, भारतीयांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला. काही दिवसांपूर्वी भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर सिंधु जल संधी (Indus Water Treaty) थांबवली होती. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याची किती टंचाई आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. 22 एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थन करत असलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 जणांची हत्या केली होती, त्यात बरेचसे पर्यटक होते.
हेही वाचा : संजय दत्तचा ‘तो’ ब्लॉकबस्टर चित्रपट ज्याचे दाक्षिणेत बनवले 4 रिमेक; शाहरुख-अनिल कपूर यांनी केलं होतं रिजेक्ट
थोडक्यात एकीकडे देश अणुशक्तीवर गर्व करत असतानाच, दुसरीकडे त्याच्या सर्वसामान्य सुविधा मात्र, दयनीय अवस्थेत आहेत. हे हिना बयात यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओतून दाखवून दिलं आहे.
SOURCE : ZEE NEWS