Source :- BBC INDIA NEWS

धरमशालातील HPCA स्टेडियम आयपीएल सामन्यादरम्यान फ्लडलाईट बंद झाल्यावर अंधारात बुडालं तेव्हाचं दृश्य.

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यंदांच्या इंडियन प्रीमियर लीगवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

तर आयपीएलसारखीच पाकिस्तानातली स्पर्धा असलेल्या पीएसएलनं त्यांचे उरलेले सामने आता यूएईमध्ये खेळवायचं ठरवलं आहे.

बीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल परिस्थितीचा आढावा घेत असून त्यानंतर यंदाची स्पर्धा सुरू राहील की नाही, यावर विचार केला जाईल अशी माहिती आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांंनी दिल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

परिस्थिती सतत बदलते आहे आणि आम्हाला अजून सरकारनं याविषयी काही निर्देश दिलेले नाहीत असंही धूमल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल (गुरुवारी 8 मे रोजी) धरमशालामधला आयपीएलचा सामना मध्येच रद्द करण्यात आला.

त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव असताना आयपीएल सुरू ठेवावी का? या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते आहे, हे सुरक्षेच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे? असे प्रश्नही काही चाहते आणि क्रिकेट विश्लेषकांनी विचारले आहेत.

धरमशाला इथे भरलेलं स्टेडियम असं रिकामं केलं

त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या धरमशाला इथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमधला सामना सुरू होता. ब्लॅकआऊट झाल्यानंतर हा सामना आधी थांबवण्यात आला आणि मग रद्द करण्यात आला.

spectators

फोटो स्रोत, Getty Images

वीज गेल्यामुळे मैदानातला एक फ्लडलाईट बंद पडला. मग दुसरा फ्लडलाईट बंद झाला आणि खेळाडू मैदानाबाहेर गेले.

लाईट्समध्ये तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करावा लागत असल्याचं त्यानंतर बीसीसीआयनं जाहीर केलं.

दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुरक्षितपणे स्टेडियमबाहेर काढण्यात आलं.

धरमशाला स्टेडियमची क्षमता साधारण 23,000 एवढी आहे आणि आजच्या सामन्यासाठी स्टेडियम 80 टक्के भरल्याचं सांगितलं जात आहे. कुठलाही मोठा गोंधळ न होऊ देता सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना सुरक्षितपणे स्टेडियममधून बाहेर काढलं.

सोशल मीडियावर काहींनी आपले अनुभव त्यानंतर व्यक्त केले आहेत.

11 मे रोजीचा IPL सामनाही धरमशालाऐवजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात येईल असं बीसीसीआयनं काही तास आधी जाहीर केलं होतं.

हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे 11 मे रोजीचा हा सामना हलवण्यात आल्याचंही बीसीसीआयनं सांगितलं आहे.

दिल्ली आणि पंजाबमधल्या सामन्यासाठी धरमशाला इथे गेलेल्या खेळाडू आणि आयोजनात सहभागी सदस्यांना विशेष ट्रेननं परत आणलं जाणार असल्याची माहिती भारतीय माध्यमांनी दिली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आयपीएलमध्ये कोणते सामने बाकी आहेत?

आयपीएलमध्ये साखळी फेरी आणि प्लेऑफ मिळून अजून सोळा सामने बाकी आहेत आणि त्यातले अनेक सामने उत्तर भारतात आणि पश्चिम भारतातही होणार आहेत.

हे सामने पुढीलप्रमाणे आहेत :

  • 9 मे – लखनौ विरुद्ध बंगळुरू – लखनौ – 7:30 PM
  • 10 मे – हैदराबाद विरुद्ध कोलकाता – हैदराबाद – 7:30 PM
  • 11 मे – पंजाब विरुद्ध मुंबई – अहमदाबाद – 3:30 PM
  • 11 मे – दिल्ली विरुद्ध गुजरात – दिल्ली – 7:30 PM
  • 12 मे – चेन्नई विरुद्ध राजस्थान – चेन्नई – 7:30 PM
  • 13 मे – बंगळुरू विरुद्ध हैदराबाद – बंगळुरू – 7:30 PM
  • 14 मे – गुजरात विरुद्ध लखनौ – अहमदाबाद – 7:30 PM
  • 15 मे – मुंबई विरुद्ध दिल्ली – मुंबई – 7:30 PM
  • 16 मे – राजस्थान विरुद्ध पंजाब – जयपूर – 7:30 PM
  • 17 मे – बंगळुरू विरुद्ध कोलकाता – बंगळुरू – 7:30 PM
  • 18 मे – गुजरात विरुद्ध चेन्नई – अहमदाबाद – 3:30 PM
  • 18 मे – लखनौ विरुद्ध हैदराबाद – लखनौ – 7:30 PM
  • 20 मे – क्वालिफायर 1 – हैदराबाद – 7:30 PM
  • 21 मे – एलिमिनेटर – हैदराबाद – 7:30 PM
  • 23 मे – क्वालिफियार 2 – कोलकता – 7:30 PM
  • 25 मे – फायनल – कोलकाता 7:30 PM

आयपीएल ही क्रिकेट जगतातली सर्वात मोठी लीग असून त्यात पाकिस्तान वगळता जगभरातल्या अनेक देशांचे क्रिकेटपटू सहभागी होतात.

या स्पर्धेतल्या दहा टीम्समध्ये मिळून यंदा साधारण 75 परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्याशिवाय प्रशिक्षक, संघ व्यवस्थापनातील इतर व्यक्ती, समालोचक, चीअरलीडर्स म्हणून अनेक परदेशी नागरीकांचा हातभार लागतो. यातल्या काहींनी चिंता व्यक्त केली आहे.

7 मे रोजी कोलकात्यातील आयपीएल सामन्यासाठी जमा झालेली गर्दी

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या परिस्थितीमुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदेशी खेळाडूंमध्येही चिंतेचं वातावरण आहे.

पाकिस्तानातही क्रिकेटवर प्रश्नचिन्ह

हे सामने रावळपिंडी, लाहौर आणि मुलतानमध्ये खेळवले जाणार होते. आता स्पर्धेचं नवं वेळापत्रक येत्या काळात जाहीर करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

8 मे रोजी रावळपिंडीमध्ये पेशावर झल्मी आणि कराची किंग्स या संघांमधला पीएसएलचा सामना होणार होता. पण तो रद्द करण्यात आला. पीसीबीनं सामना रद्द करण्याचं जाहीर केलं, तेव्हा कुठलं कारण दिलं नाही.

मात्र काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडी स्टेडियमजवळ एका ड्रोन हल्ल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला. पाकिस्तान सरकारनं या ड्रोनविषयी अधिकृत पुष्टी केलेली नाही.

पण पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय ड्रोन स्टेडियमजवळ पाडल्याचा दावा केला. भारतानं त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रावळपिंडी

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानात 11 एप्रिल ते 18 मे या कालावधीत पीएसएलचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीजसह बांग्लादेशातले खेळाडूही या स्पर्धेत खेळत आहेत.

पण भारतानं पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानची हवाई हद्द जवळपास बंद झाली आणि हे खेळाडू आता पाकिस्तानातून बाहेर पडू शकत नाहीयेत. त्याविषयीही काहींनी चिंता व्यक्त केली आहे.

इतर देशांनी काय म्हटलं आहे?

वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनसह आम्ही या प्रदेशात असलेल्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच्या स्वास्थ्य आणि सुरक्षेची काळजी घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डही ब्रिटनच्या परराष्ट्र विभागाच्या संपर्कात आहे. बुधवारी (7 मे 2025 ) रोजीच इंग्लंडचे काही खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांनी यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलवर चर्चा केली.

तर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही सुरक्षिततेचा आढावा घेत असल्याचं म्हटलं आहे. बांगलादेशाचे काही खेळाडू पाकिस्तानात खेळत असून बांगलादेश क्रिकेट बोर्डही तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC