Source :- ZEE NEWS
Balochistan: पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानने छेडले गृहयुद्ध आता भयानक वळवणार पोहचले आहे. बलुचिस्ताने स्वतंत्र बलुच प्रातांची घोषणा केली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तनचा एक भूभाग आहे. प्रत्यक्षात, जर बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. याचे कारण म्हणजे बलुचिस्तानमध्ये 590 कोटी टन खनिज साठे आहेत. पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण, तांबे आणि नैसर्गिक वायूचे महाप्रचंड साठे बलुचिस्तानमध्ये आहेत.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. परंतु त्याचे महत्त्व केवळ त्याच्या आकारापुरते मर्यादित नाही तर नैसर्गिक संसाधनांसाठी हा प्रांत ओळखला जातो. हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे, ज्यामुळे तो पाकिस्तानसाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा बनतो. येथे असलेले सोने, तांबे आणि नैसर्गिक वायूसारखे खनिज संसाधने पाकिस्तानसाठी महत्त्वाची आहेत. परंतु, जर हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला तर देशाला गंभीर आर्थिक, ऊर्जा आणि सुरक्षा संकटांना तोंड द्यावे लागू शकते.
बलुचिस्तानमध्ये खनिजांचा मोठा खजिना
बलुचिस्तानला खनिजांचा खजिना देखील म्हटले जाते. बलुचिस्तानमध्ये 590 दशलक्ष टन खनिज साठे आहेत. ज्यामध्ये 60 दशलक्ष औंस सोन्याचा (सुमारे 1700 टन) जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. त्याचा रिको डिक परिसर हा सर्वात मोठा सोन्याचा साठा मानला जातो. याशिवाय, या प्रांतात तांब्याचे मोठे साठे देखील आहेत, ज्याची एकूण किंमत सुमारे 174.42 लाख कोटी रुपये आहे. ब्लूमबर्गच्या एका जुन्या अहवालानुसार, रिको डिक हा जगातील सर्वात मोठ्या अविकसित तांबे आणि सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये अर्ध्या शतकाहून अधिक काळ दरवर्षी 200,000 टन तांबे आणि 250,000 औंस सोने उत्पादन करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानी सरकार, बॅरिक गोल्ड आणि अँटोफागास्टा पीएलसी यांच्यातील वादामुळे खाण प्रकल्पाची प्रगती थांबली होती. जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तान हा प्रचंड स्रोत गमावेल, जो त्याच्या आर्थिक समृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावतो.
आर्थिक संकट आणि ऊर्जा समस्या
बलुचिस्तानचा प्रदेश 3,47,190 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे, जो पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 44% आहे. तथापि, येथील लोकसंख्या फक्त 3.6% म्हणजेच 1.49 कोटी आहे. या प्रांताचे एक महत्त्वाचे योगदान पाकिस्तानच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात आहे, जे देशाच्या ऊर्जा संकटाचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. जर हा प्रदेश पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल. कारण त्याला बाह्य स्रोतांकडून महागडी ऊर्जा आयात करावी लागेल. यामुळे त्याची आर्थिक स्थिती आणखी कमकुवत होईल. याचे कारण म्हणजे पाकिस्तान आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत आहे.
बलुचिस्तान वेगळे झाल्यास पाकिस्तानसाठी सुरक्षा आणि राजनैतिक संकट निर्माण होऊ शकते. हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तानच्या जवळ असल्याने पाकिस्तानसाठी अडचण निर्ममाण होऊ शकते. याशिवाय, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत चीन देखील या प्रदेशात सक्रिय आहे. जर बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकिस्तानची सुरक्षा परिस्थिती आणि राजनैतिक शक्ती दोन्ही प्रभावित होऊ शकतात.
जर बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकिस्तानला गंभीर आर्थिक, ऊर्जा, सुरक्षा आणि राजनैतिक संकटांना तोंड द्यावे लागेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत आहे आणि बलुचिस्तान वेगळे झाल्याने ती कोसळू शकते. यामुळे, पाकिस्तानला त्याच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाबाबत मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. हे पाकिस्तानसाठी अस्तित्वाचे संकट बनू शकते, ज्यामुळे देशाला संकटांवर मात करणे कठीण होईल.
बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत मोठं कनेक्शन
बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत देखील मोठं कनेक्शन आहे. अनेक मराठा बलुचिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत. पानिपतच्या लढाईत अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांचा पराभव केला होता. या युद्धानंतर अब्दालीच्या सैनिकांनी 22 हजार मराठा सैनिकांना युद्धकैदी केलं होतं. 22 मराठा सैनिकांना घेऊन अब्दाली हा अफगाणिस्तानच्या दिशेनं निघाला होता. या युद्धात बलुचिस्तानमधील मीर नसीर खाननं अब्दालीला मदत केली होती. त्यामुळे अब्दालीनं मीर नसीर खानला मराठा कैद केलेले मराठा सैनिक भेट दिलेत. 1994 मध्ये मीर नसीर खानच्या गुलामगिरीतून मराठा सैनिक मुक्त झालेत. बलुचिस्तानमधल्या मराठ्यांना बुगटी मराठा म्हणून ओळखलं जातं. यातील साहू मराठा हे शेतीत पारंगत होते. साहू मराठे धर्मानं मुस्लीम बनले मात्र, महाराष्ट्राची परंपरा ते विसरले नाहीत, ते आजही मराठी संस्कृती जपतात.
SOURCE : ZEE NEWS